Devendra Fadnavis on Shaktipeeth : मराठवाड्यातील दुष्काळी चित्र बदलण्यासाठी शक्तीपीठ (Shaktipeeth) हे उत्तर असणार आहे,असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी वित्त विभागाकडून कोणताही आक्षेप घेण्यात आलेला नाही. जेव्हा एखादा महामार्ग बांधला जातो, त्यावेळी तो अर्थव्यवस्थेसाठी दालने उघडत असतो आणि त्यामधून विकासाचा मार्ग प्रशस्त होत असतो.
जगभरातील देशांकडून पायाभूत सुविधांची कामही कर्ज घेऊनच तयार केली जातात, जेव्हा पायाभूत सुविधांसाठी कर्ज घेतले जातात. तेव्हा ते उत्तम लक्ष मानलं जातं आणि ते अर्थव्यवस्थेला बळकटी देणार असतं, समृद्धी महामार्गाने (Samruddhi Mahamarg) सुद्धा असेच चित्र बदललं,असं मुख्यमंत्री म्हणालेत.
नक्की वाचा : अलकनंदा नदीत बस कोसळुन भीषण अपघात;दोन जणांचा मृत्यू
मराठवाडा आणि दुष्काळी भागात चित्र बदलणारा शक्तीपीठ महामार्ग (Devendra Fadnavis on Shaktipeeth)
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मराठवाड्यातील दुष्काळी चित्र बदलण्यासाठी शक्तीपीठ हे उत्तर असणार आहे. तो एक ॲक्सेस कंट्रोल रोड नसेल,तर त्या महामार्गावर प्रत्यक्ष रेंजमध्ये आम्ही १०० शेततळी बांधणार आहोत. तसेच ब्रिज कम बंधारे बांधून पाणी अडवण्याचा कार्यक्रम राबवणार आहोत आणि ते जलसंवर्धनासाठी उपयुक्त होईल. त्या माध्यमातून ग्रीन एनर्जी तयार करणार आहोत. त्यामुळे मराठवाडा आणि दुष्काळी भागात चित्र बदलणारा शक्तीपीठ महामार्ग असेल,असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, शक्तिपीठ महामार्गाला कॅबिनेट मंजुरी देण्यात आल्यानंतर शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलन सुरु झाली आहेत.
अवश्य वाचा : वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! पाचही वर्षात वीजदर कमी होणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन