Jayant Patil: मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा,अशी मोठी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी केली आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत.तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीचे वेगवेगळे वर्धापन दिन सोहळे होत आहेत. अशातच आता जयंत पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची मागणी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे केल्याने, राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
नक्की वाचा : नोकरावर प्रेम,नवऱ्याचा गेम! सोनमनेच रचला राजाच्या हत्येचा कट
जयंत पाटील नेमकं काय म्हणाले ? (Jayant Patil)
‘मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा.आपल्याला बरेच पुढे जायचे आहे.
हा पक्ष स्थापन झाला, त्यावेळी शिवाजी पार्कमध्ये लाखोंचा जनसमुदाय पवार साहेबांची भूमिका ऐकण्यासाठी एकत्रित आले. १९९९ पासून २०१४ पर्यंत सतत पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत राहिला. या राज्याच्या जडणघडणीतले अनेक निर्णय सत्तेत असताना या पक्षातल्या सगळ्या धोरणांना घेण्याचं काम केलं. या १५ वर्षाच्या कालखंडात पक्षही अतिशय सामर्थ्याने वाढवण्याचे काम झालं. मात्र १४ साल उजाडले. भाजपची सत्ता आली आणि बरीच लोकं आमच्या रेल्वेतून उतरून दुसऱ्या रेल्वेत जाऊन बसायला लागेल.मात्र आपण सगळे पवार साहेबांच्या मागे निष्ठेने राहीलो. तुमचं कौतुक मला यासाठीच आहे की अनुकूल असो प्रतिकूल असो, यश मिळो अथवा न मिळो तुम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना आयुष्यभर साथ दिली आणि म्हणून संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्व असतं,असंही ते म्हणालेत.
अवश्य वाचा : मोठी बातमी!पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी उठवली,हायकोर्टाचा निर्णय
‘ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम आहे’ (Jayant Patil)
२०१९ ला लोकसभेच्या वेळी चार खासदार निवडून आले. बारामती, सातारा, रायगड आणि शिरूर पुन्हा आम्ही सगळे विधानसभेच्या कामाला लागलो. विधानसभेच्या कामाला लागल्यावर एक दिवस पवार साहेबांना नोटीस दिल्यावर पवार साहेब म्हटले, मला काय बोलवता मीच येतो ना तुमच्याकडे. ईडीने नोटीस दिली तेव्हा पोलिस घरी येवून सांगायला लागले येऊ नका. ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम अशी आहे.आपण तुकारामांच्या बाजूचे आहोत. भाजपचे आधी दोनच खासदार होते. आज तो देशातील मोठा पक्ष आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र काम करत रहायचंय. राज्याचं नेतृत्व आपण करु,असंही त्यांनी सांगितले.