Manoj Jarange Patil : मनोज जरांगेची मोठी घोषणा ; २४ डिसेंबरनंतर ‘या’ ठिकाणी आंदोलन सुरु

मराठा समाजाला २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर पुन्हा मोठे आंदोलन सुरु करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.

0

नगर : मागील अनेक दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करत त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. यासाठी त्यांच्या विविध ठिकाणी सभा होत आहे. आरक्षण देण्यासाठी त्यांनी राज्यसरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली आहे.

नक्की पहा : आयसीसीची मोठी घोषणा; हॉल ऑफ फेममध्ये ‘या’ भारतीय क्रिकेटरचा समावेश

मराठा समाजाला २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर पुन्हा मोठे आंदोलन सुरु करणार आहे. आता हे आंदोलन जालन्यात नाही तर मुंबईत सुरु करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. २४ डिसेंबरनंतर सरकारला एक दिवसही मिळणार नाही. तसेच २५ डिसेंबर रोजी आपण आपली भूमिका जाहीर करु, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही पहा:  मानसी नाईकची ‘लावा फोन चार्जिंगला’ लावणी  प्रेक्षकांच्या भेटीला

२४ डिसेंबरपर्यंत सरकार काय करते हे आम्ही बघत आहोत. आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही तर २५ तारखेला बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार आहोत. तशी वेळ येणार नाही, असा विश्वास आम्हाला आहे. परंतु वेळ आलीच तर आरक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत. सरकारला कायदा पारीत करावा लागत असेल तर त्याला आधार पाहिजे आणि आता कुणबी नोंदी लाखांत सापडत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत कायदा करण्यात काहीच अडचण नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

सत्तर वर्षांपासून आमच्या पोरांचं वाटोळं करण्यात आले आहे. त्यांना आरक्षण मिळाले असते तर आज मराठा समाज सर्वात पुढे गेला असता. यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली नसती. आज खंडेरायाचे दर्शन घेऊन सरकारला सदबुद्धी द्यावी, असं मागणं मागणार आहे आणि लवकर आरक्षण मिळू द्या, हेच खंडेरायाच्या चरणी साकडे घालणार आहे, असं जरांगे  यांनी म्हटलं आहे.