Radhakrishna Vikhe Patil : संगमनेर : ४० वर्षे सत्ता असूनही ज्यांना ४० कामे जमली नाही आणि आता गावातील विकासकामे राज्याचे जलसंपदा मंत्री (Water Resources Minister) तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या माध्यमातून सुरू आहेत. हा चालू असलेला विकास कामांचा वाढता आलेख झेपत नसल्याने विरोधक नाहक भ्रष्टाचाराचे (Corruption) आरोप करत आहे. या सर्व आरोपांची लवकरात लवकर चौकशी करावी. जर आरोप सिद्ध झाले नाही तर आरोप करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून जोर्वे ग्रामपंचायतवरील सत्ताधारी विखे गटाने केली आहे.
नक्की वाचा : हिंदी विरोधातील मोर्चाच्या तारखेत बदल; आता निघणार या दिवशी मोर्चा
प्रशासनाला विखे गटाने दिले निवेदन
दरम्यान, संगमनेर पंचायत समिती प्रशासनाला सत्ताधारी विखे गटाने गुरुवारी (ता.२६) निवेदन दिले. यावेळी सरपंच प्रिती दिघे, शिवाजीराव कोल्हे, बाबासाहेब काकड, सचिन दिघे, संपतराव राक्षे, हरीष जोर्वेकर, प्रकाश काकड, विशाल थोरात, नंदू थोरात, शिवाजी काकड, रमेश इंगळे, प्रशांत इंगळे, सचिन मोकळ, अभिषेक चव्हाण, बाबासाहेब थोरात, जगदीश इंगळे, भाऊसाहेब वाकचौरे, रविंद्र गाडेकर, बंडू इंगळे, मिराबाई थोरात, लताताई काकड, मिना इंगळे, वनिता चव्हाण, अलका चव्हाण, अनिता लोणारी, दुर्गा लोणारी, निशिगंधा इंगळे, सुनीता बर्डे, अनिता मोरे, रंजना जाधव, सरला जोर्वेकर आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा : अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई
या निवेदनात सत्ताधारी गटाने म्हटले की, (Radhakrishna Vikhe Patil)
गावात सुसज्ज असे ग्रामपंचायत कार्यालय, ट्रॅक्टर, ट्रॉली, टँकर, ब्लोअर, रुग्णवाहिका, दवाखाना, अमररथ, पथदिवे, सौरदिवे, गटारी, रोहित्र, पाणीपुरवठा, सभामंडप, रस्ते, वैयक्तिक लाभाच्या योजना अशी विविध प्रकारची विकासकामे झाली आहे, तर काही चालू आहे. गावातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम सुरू होणार आहे. परंतु, हे विरोधकांना पाहवत नसल्याने भ्रष्टाचाराचा आरोप करुन समाज माध्यमांवर आम्हांला बदनाम करण्याचे काम करत आहे. मात्र, महिला सरपंच आहे म्हणून काहीही आरोप तुम्ही करत असाल तर आम्ही कदापिही सहन करणार नाही. इतकी वर्षे जनतेला कायम वेठीस ठेवलं आता हे बंद करा. महिलांना मोफत शिलाई मशिन प्रशिक्षण देऊन मशिन वाटल्या, मोफत बेकरी प्रशिक्षण दिलं. प्रत्येक कामात अडथळा आणणे, ग्रामसेवकांना अरेरावीची भाषा वापरणे आणि एका सदस्याने तर राजकीय वरदहस्ताने व दादागिरीच्या बळावर ग्रामपंचायतची जागा व विहीर बळकावण्याचा प्रयत्न केला, हे मुद्दे आम्ही बोललो म्हणून आम्ही भ्रष्टाचार केला. त्यामुळे विरोधकांनी जे बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहे त्याची लवकरात लवकर चौकशी करावी. जर हे आरोप सिद्ध झाले नाही तर ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सत्ताधारी गटाने पंचायत समिती प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.