Sangram Jagtap : नगर : विद्यार्थ्यांना बालवयातच शिक्षणाबरोबर खेळाचे (Sports) चांगले प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. आता क्रीडा स्पर्धेमध्ये देखील करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहे, तरी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या खेळामध्ये करियर बनवण्यासाठी ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे. आजचा विद्यार्थी हा टीव्ही-मोबाईलवर गुंतला असल्यामुळे त्याची मैदानावरची आवड कमी झाली आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा मैदानांवर आण्यासाठी क्रीडांगणे निर्माण करणे गरजेचे आहे. शहरांमध्ये विविध भागात खेळाच्या विविध स्पर्धेसाठी लागणाऱ्या मैदानांची निर्मिती केली जात आहे. सारसनगर परिसरामध्ये क्रीडा संकुलनाचे (Sports Complex) काम अंतिम टप्प्यात आले असून ते आता लवकरच खेळण्यासाठी सुरू होणार आहे. याचबरोबर गंगा उद्यानाच्या पाठीमागे देखील क्रीडा संकुलनाचे काम चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर (Sampat Baraskar) यांनी अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये फुटबॉल खेळासाठी मैदान निर्माण करून दिले आहे. विद्यार्थ्यांना खेळामध्ये करिअर घडवण्यासाठी चांगल्या सुविधा व प्रशिक्षकाची खरी गरज असते, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.
नक्की वाचा : हरिश्चंद्रगड, रतनगड, सांधण दरी परिसरात पर्यटनास तात्पुरती बंदी
बारस्कर यांच्या प्रयत्नातून फुटबॉल ॲकॅडमी चे उद्घाटन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून कॉटेज कॉर्नर येथे संघर्ष प्रतिष्ठान फुटबॉल ॲकॅडमी चे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, किरण बारस्कर, सुहास करंडे, महेश गलांडे, मयूर टेमक, शशी गायकवाड, संदीप दरंदले, घनश्याम सानप, धीरज लोणारे आदींसह पालक खेळाडू प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा : सीएकडून व्यवसायिकाची ३८ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
संपत बारस्कर म्हणाले की, (Sangram Jagtap)
प्रभागाच्या सर्वांगीण विकासाबरोबर विद्यार्थ्यांना बाल वयातच खेळण्यासाठी मैदानी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. म्हणून कॉटेज कॉर्नर परिसरात फुटबॉल मैदानाची निर्मिती केली आहे, जगामध्ये सर्वात जास्त फुटबॉल हा खेळ खेळला जातो आणि तो लोकप्रिय देखील आहे. खेळाडूला योग्य प्रशिक्षण मिळाल्यास तो नक्कीच घडला जाईल. संघर्ष फुटबॉल अकॅडमीच्या माध्यमातून शहरात चांगले फुटबॉलपटू निर्माण होतील. खेळाच्या माध्यमातून आपले आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होत असते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची गरज आहे, विद्यार्थ्यांना देखील बालवायातच वृक्षाबद्दल प्रेम निर्माण व्हावे यासाठी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण केले आहे. आ. संग्राम जगताप यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे हा परिसर विकसित म्हणून ओळखला जात आहे, असे त्यांनी सांगितले.