Voting : कर्जत: तालुक्यातील रविशंकर विद्यामंदिरने (Ravi Shankar Vidya Mandir) लोकशाही पद्धतीने मतदान (Voting) घेत शाळा आणि वर्ग प्रतिनिधी निवडले. विद्यालयाने मागील २२ वर्षांपासून लोकशाही (Democracy) पध्दतीने प्रतिनिधी निवडीची परंपरा कायम ठेवली आहे. शाळा प्रतिनिधी मुले या गटातून यशराज थोरात तर मुलींमधून अनुष्का गदादे यांनी तर वर्गनिहाय प्रतिनिधींनी विजय संपादन केला.
नक्की वाचा : हरिश्चंद्रगड, रतनगड, सांधण दरी परिसरात पर्यटनास तात्पुरती बंदी
असा असतो संपूर्ण निवडणूक कार्यक्रम
लोकशाही पद्धतीने निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमानुसार जशी लोकसभा-विधानसभा निवडणूक होते. तशीच विद्यामंदिराची निवडणूक प्रक्रिया संस्थेचे प्रमुख कार्यवाह नंदकुमार लांगोरे, मुख्याध्यापिका सविता बळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवतात. वर्ग प्रतिनिधी आणि शाळा प्रतिनिधी निवडताना त्या पात्र उमेदवाराना सर्व विषयात ब-१ श्रेणी प्राप्त करणे आवश्यक असते. यासह त्याचे वर्गात आणि शाळेत चांगले वर्तन असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केले जाते. पात्र आणि निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची यादी शाळेतील प्रथम दर्शनी फलकावर लावण्यात येते. निवडणूक अर्ज दाखल करण्यापासून ते माघार घेण्याचा कालावधी देखील नमूद करीत शेवटी दोन दिवस त्या उमेदवारांस प्रचाराला देखील वेळ दिला जातो. १३ जून ते २५ जूनपर्यंत या सर्व प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी शिक्षिका सारिका बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली इतर शिक्षक पारदर्शकपणे राबविण्यास सहकार्य करतात. यातील काही वर्गाचे प्रतिनिधी बिनविरोध निवडण्यात आले.
अवश्य वाचा : सीएकडून व्यवसायिकाची ३८ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
सर्व विद्यार्थ्यासमोर मतमोजणीची प्रक्रिया (Voting)
बुधवारी (ता.२५) मतदान प्रक्रिया होणार असल्याने वर्गनिहाय मतदान पेट्या आणि मतपत्रिका मतदारांना वितरित करण्यात आल्या. वर्गापुढे उमेदवार विद्यार्थी उभे राहत आपणांस मतदान करावे, अशी विनंती करीत. निर्भीडपणे सकाळी ९.३० ते १२ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडते. त्याच दिवशी तात्काळ सीलबंद मतपेट्या मैदानात आणत सर्व विद्यार्थ्यासमोर मतमोजणीची प्रक्रिया सर्व शिक्षक पूर्ण करीत उमेदवारांना पडलेल्या मतानुसार निकाल जाहीर केला.
शाळा प्रतिनिधी मुले या गटातून यशराज थोरात तर मुलींमधून अनुष्का गदादे यांनी तर वर्गनिहाय प्रतिनिधींनी विजय संपादन केला. निवडून आलेल्या उमेदवारांने आपल्या वर्गाची शिस्त, विविध उपक्रमात जास्तीतजास्त सहभाग घेत त्याची गुणवत्ता सिद्ध करणे यासह प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्याच वर्गाचा डंका राहील यासाठी प्रयत्न करण्यात महत्वाची भूमिका निभावतात. मागील २२ वर्षांपासून रविशंकर विद्यामंदिरात शाळा प्रतिनिधी आणि वर्ग प्रतिनिधी लोकशाही मतदान पद्धतीने निवडण्याची परंपरा आहे. यंदा देखील सदरची निवडणूक निर्भीड वातावरणात पार पडली.
१३ जून रोजी शाळा-वर्ग प्रतिनिधीची निवडणुकीची घोषणा करण्यात आली. १७ ते १९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे. २० तारखेला प्राप्त उमेदवारी अर्जाची छाननी होत वैध उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. २१ ला अर्ज माघारी घेण्याचा दिनांक होता. तर २२ ते २४ जूनपर्यंत प्रचार करण्याची मुदत देण्यात आली. २५ ला प्रत्यक्ष मतदान होत दुपारी २ वाजता सर्व विद्यार्थ्यांसमोर मतमोजणी प्रक्रिया पार पडली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सारिका बनकर यांनी दिली.