Congress : संगमनेर : अहिल्यानगर हा जिल्हा हा काँग्रेस (Congress) विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. सतत भूलथापा देऊन आणि जातीयवाद करून सत्तेवर आलेल्या महायुतीच्या (Mahayuti) पक्षांचे खरे रूप जनतेला कळाले आहे. यामुळे सर्वसामान्य जनता, नागरिक, युवक व महिला यांच्यामध्ये सत्ताधाऱ्याविरुद्ध मोठा संताप निर्माण झाला असून काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुका (Elections) काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात, अशी एकमुखी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली.
नक्की वाचा : श्रीरामपुरात राजकीय भूकंप झाल्यास आश्चर्य नको : सुजय विखे पाटील
अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक
संगमनेर येथील अमृतनगर येथे अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली. याप्रसंगी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार हेमंत ओगले, कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने, प्रतापराव शेळके, मधुकरराव नवले, राहुरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब आढाव ,अकोले तालुकाध्यक्ष शिवाजी नेहे, संभाजी रोहोकले, ॲड. पंकज लोंढे, बाबासाहेब दिघे, किरण पाटील, शब्बीर शेख, शहाजी भोसले, संभाजी माळवदे, तुषार पोटे, सचिन चौगुले, समीर काझी, राहुल उगले, नसीर शेख, दादा पाटील वाकचौरे ,अरुण मस्के, नितीन शिंदे, साहेबराव बागुल, अजय फटांगरे, अरुण मस्के, रिजवान शेख, सोमेश्वर दिवटे, यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये सर्व जिल्हा कमिटी सदस्य सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था या स्वबळावर लढवण्याची एकमुखी मागणी केली.

अवश्य वाचा: हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?
याप्रसंगी बोलताना आमदार हेमंत ओगले म्हणाले की, (Congress)
काँग्रेस पक्षाला मोठी विचारधारा आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारा हा पक्ष आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर जिल्ह्यातील नागरिकांचा मोठा विश्वास आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठी संधी आहे. काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यामुळे या सर्व निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात अशी जिल्ह्यातील तमाम काँग्रेसजणांची प्रमुख मागणी असून आमचे नेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही मांडलेले असून त्यांचा निर्णय आम्हाला मान्य आहे.
तर कार्याध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की, महायुतीच्या भूलथापांना लोक कंटाळले आहे. खरे तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव निश्चित होता. परंतु महायुती का जिंकली हे सर्वश्रुत आहे. यामुळे जनतेच्या मनामध्ये मोठी चीड आहे. स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यकर्त्यांसाठी मोठी संधी असून काँग्रेस पक्ष ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्ष सर्वात मोठा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर करण ससाने म्हणाले की, देशाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आता संपूर्ण देशातील वातावरण बदलले आहे. बिहारमध्ये सुद्धा काँग्रेसचे सरकार येणार असून महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्ष एक नंबरचा ठरेल.
तर मधुकरराव नवले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा काँग्रेसचा विचार आहे. हा विचार लोकशाही वाचवण्यासाठी असून काँग्रेससाठी आता जनता एकवटली असल्याने आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढण्याची काँग्रेस जणांची मोठी मागणी आहे. यावेळी सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी आपली मनोगते व्यक्त केली. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदा या स्वबळावर लढवण्याची मागणी केली.



