नगर : राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान (Controversial statement about farmers) केले होते. सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचे,कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं विखे पाटील यांनी म्हटलं होते. यावरून विखे पाटलांवर सडकून टीका करण्यात आली होती. तसेच शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. यानंतर आता विखे पाटलांनी आपल्याच वक्तव्यावर यु टर्न (U-turn) मारल्याचे पाहायला मिळाले आहे.
नक्की वाचा: “आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची”- राधाकृष्ण विखे पाटील
शेतकऱ्यांबाबतच्या विधानावर भाष्य (Radhakrishna Vikhe Patil)
शेतकरी कर्जमाफीवर बोलताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील वादग्रस्त विधान केले होते. यावर स्पष्टीकरण देताना विखे पाटलांनी म्हटले की, ‘एखाद्या वक्तव्याचा किती विपर्यास व्हावा याचं मला आश्चर्य वाटतं. ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या ज्या निवडणुका होतात, त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण कर्ज घेतो, मात्र त्यातून कोणती उत्पादकता होत नाही. कर्ज घ्यायच, पुन्हा कर्जबाजारी व्हायच आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं मी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोललो.
अवश्य वाचा: ‘लास्ट स्टॉप खांदा’तून उलगडणार प्रेमाचा इमोशनल कॉमेडी ड्रामा;चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
‘विरोधकांना फक्त कर्जबाजारी हा मुद्दा मिळाला’ (Radhakrishna Vikhe Patil)
आज देखील तीच अवस्था आहे, विरोधकांना फक्त कर्जबाजारी हा मुद्दा मिळाला. अनेक वर्ष मी सामाजिक जीवनात काम करतोय, मी बेताल वक्तव्य कधी करत नाही. माझा जो पहिला मुद्दा होता तो दाखवला नाही, कर्जबाजारी होतो आणि कर्जमाफी एवढाच मुद्दा पुढे आला. संपूर्ण वृंत्तात जर दाखवला असता तर हा मुद्दा आला नसता’ असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं आहे.



