Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं आज बारामतीत विमान अपघातामध्ये (Plane Crash in Baramati) दुःखद निधन झाले आहे. अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अत्यांच्या अकाली मृत्यूनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शोक व्यक्त करत लोकनेता हरवल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच राज्यामध्ये आज शासकीय सुट्टीसह तीन दिवसांचा दुखवटाही जाहीर (Three days of mourning) करण्यात येत असल्याची घोषणाही (Announcement) केली आहे.
नक्की वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ पर्व संपलं; कशी होती अजित दादांची राजकीय कारकीर्द ?
एक दमदार आण दिलदार मित्र सोडून गेला (Devendra Fadnvis)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, “अजित पवार हे महाराष्ट्रातले लोकनेते होते, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेले नेते होते. अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणारे आहे. माझ्यासाठी वैयक्तिक एक दमदार आण दिलदार मित्र सोडून गेला आहे. मी आणि एकनाथ शिंदे लवकरच बारामतीला निघणार आहोत. पंतप्रधान,गृहमंत्री यांच्याी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या घटनेची कल्पना दिली आहे. त्यांनीही प्रचंड दुख व्यक्त केले आहे. संपूर्ण देशात या घटनेमुळे हळहळ पसरली आहे. पुढील गोष्टी परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील.”
अवश्य वाचा: गिरीश महाजनांना नडणाऱ्या माधवी जाधव नेमक्या कोण?
राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर (Devendra Fadnvis)
फडणवीस पुढे म्हणाले की,”संपूर्ण पवार कुटुंब बारामतीला पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने पुढचे निर्णय घेतले जातील. महाराष्ट्रात आज शासकीय सुट्टी घोषित केली आहे. तीन दिवसांचा दुखवटा देखील जाहीर करण्यात आलाय. हे कधीही भरून न निघणारे नुकसान आहे. लोकनेते निघून गेल्यानंतर पोकळी निर्माण होते, ती भरून काढणे कठीण आहे. संघर्षाच्या काळात आम्ही एकत्र काम केलं आहे. या घटनेवर विश्वास ठेवण्यास मन तयार होत नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.



