Shrigonda | श्रीगोंद्यात भक्तीचा महाकुंभ!; ‘शेख महंमद महाराज’ यात्रेत लाखांचा जनसागर

0

Shrigonda | श्रीगोंदा : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अद्वितीय प्रतीक असलेल्या श्रीगोंद्याच्या (Shrigonda) संत शेख महंमद महाराज यांच्या तीन दिवसीय वार्षिक यात्रोत्सवात लाखो भाविकांनी भक्तिभावाने हजेरी लावली. भक्ती, शक्ती आणि सामाजिक सलोख्याचा संगम या यात्रेच्या निमित्ताने पाहायला मिळाला.

अवश्य वाचा-  कर्जतमध्ये बंद पाळत गोदड महाराज मंदिरासमोर धरणे आंदोलन; ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी

उत्सवास सुरुवात (Shrigonda)

यात्रेच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी पहाटे महाराजांच्या समाधी स्थळावर चादर आणि शेरा अर्पण करून उत्सवास सुरुवात झाली. दिवसभर भाविकांनी नवसपूर्ती केली. वाहन चालक-मालक संघटना, व्यापारी असोसिएशन आणि बँड पथकांनी सवाद्य शेरणी वाटप केले. सायंकाळी पोलीस निरीक्षक किरण शिंदे, तहसीलदार सचिन डोंगरे आणि नायब तहसीलदार मिलिंद जाधव यांनी महसूल व पोलीस प्रशासनाच्या वतीने ‘मानाचा शेरा’ अर्पण केला. शुक्रवारी रात्री अश्व मिरवणूक आणि पालखी सोहळा (छबीना) मोठ्या उत्साहात पार पडला.

हे वाचा – वेळेआधी विमानाने केले उड्डाण; खासदार निलेश लंकेंचा पारा चढला

← Back

Thank you for your response. ✨

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी कुस्त्यांचा भव्य आखाडा भरवण्यात आला होता. यामध्ये दिल्ली, पुणे, सातारा, जामखेड, आष्टी आणि नगर येथील नामवंत मल्लांनी आपले कसब दाखवले. दिवंगत संतोष खेतमाळीस यांच्या स्मरणार्थ लावलेली शेवटची मानाची कुस्ती मनोज पवार (आष्टी) आणि योगेश पवार (नेप्ती) यांच्यात झाली. ही लढत बरोबरीत सुटली. सहभागी मल्लांना ५०० रुपयांपासून २५ हजार रुपयांपर्यंतची बिदागी देऊन सन्मानित करण्यात आले.

हे पहा – रात्री इंटरनेट चालू ठेवणं पडू शकतं महागात!

चोख बंदोबस्त (Shrigonda)

या सोहळ्याला माजी मंत्री बबनराव पाचपुते, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांसह अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली. मंदिर परिसरात केलेली आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. विशेष म्हणजे, पोलीस प्रशासनाने राबविलेली ‘फ्लेक्स मुक्त यात्रा’ संकल्पना यंदा पूर्णपणे यशस्वी ठरली. यात्रेदरम्यान काही ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रकार घडले, मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत परिस्थिती हाताळली. भुरट्या चोरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षाने विशेष खबरदारी घेतली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here