Manoj Jarange Patil : मराठ्यांचा ७० वर्ष घात झाला; ओबीसी नेत्यांवर मनाेज जरांगे पाटलांचा आराेप

0

नगर : संघर्ष याेद्धा मनाेज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा महाराष्ट्र (Maharashtra) दाैरा सुरू केला आहे. आज ते पुणे जिल्ह्यातील दाैंड तालुक्यातील वरवंड येथे दाैऱ्यावर आहे. येथे “मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण असतानाही घात झाला. या सगळ्यांनी षडयंत्र केलं. ७० वर्षे सत्तेवर ओबीसी (OBC) नेत्यांचा किती प्रभाव होता. मराठ्यांचे पुरावे असतानाही बाहेर आले नाहीत. यांनी ठरवून षडयंत्र केलं होतं. मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर मराठ्यांचे पोर मोठे होतील, मराठ्यांच्या पोरांना मोठं होऊ द्यायचं नाही, यासाठी लागेल ते प्रयत्न करायचे. हे प्रयत्न केले आणि ७० वर्षे मराठ्यांच्या पोरांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली, असा आराेप जरांगे पाटलांनी केला आहे. 

हे देखील वाचा : मनोज जरांगेची मोठी घोषणा; २४ डिसेंबरनंतर ‘या’ ठिकाणी आंदोलन सुरु

मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदाेलन सुरूच आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा कालपासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. मनोज जरांगे पाटील यांना गावागावातील मराठा बांधव स्वागतासाठी उभे असल्याने कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास उशीर होतो. याबाबत त्यांनी दिलगीर व्यक्त केली. ते म्हणाले की, “सकाळी ११ ची वेळ ठरली होती. गावागावातील लोकांनी गाडी अडवल्याने मला तुमच्यापर्यंत पोहोचायला उशीर झाला, त्याबद्दल मी तुमची मनापासून माफी मागतो. तुम्हाला खूप वेळ उन्हात बसायला लावले. पण माझी सध्याची परिस्थिती अशी झाली की दिलेल्या वेळेवर मी पोहोचू शकत नाही, कारण लोक रस्त्यावर अडवायला लागले. मराठ्यांचे लोक रस्त्यावर उभे असताना त्यांच्यासोबत त्यांचे आई-वडील-बहीण उभे असताना त्यांना डावलून पुढे येणाऱ्यांची माझी अवलाद नाही. म्हणून मला उशीर होतोय. मी राजकारणी नाही, म्हणून लोकांना वाट बघायला लावायचं आणि नंतर जायचं. मी या समाजाला मायबाप मानलं आहे. मी तुमचं लेकरू आहे. स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी घराघरातील मराठा ताकदीने एकजूट झाला आणि मराठ्यांची प्रचंड मोठी त्सुनामी राज्यात आली. मराठ्यांच्या त्सुनामी पुढे सरकारलाही नमतं घ्यावं लागलं.” 

नक्की वाचा : विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताची धडक; न्युझीलँडवर विजय

७० वर्षांपासून सरकारने पाळलेले जे काही बगलबच्चे आहेत. त्यांनी ७० वर्षांपासून मराठ्यांचे असणारे पुरावे स्वतःच्या बुडाखाली झाकून ठेवले. समित्या नेमल्या, आयोग नेमले, सर्व्हेही केला. पण मराठ्यांची नोंद कोणालाच सापडली नाही. मराठा ७० वर्षांपासून ओबीसी आरक्षणात असतानाही मराठ्यांना आरक्षण नाही. याचं कारणही आमच्या मराठ्यांनी कधी शोधलं नाही”, अशी खंतही जरांगेंनी बोलून दाखवली. “१८०५ पासून १९६७ पर्यंत आणि १९६७ पासून २०२३ पर्यंत न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीने मराठ्यांचे दस्तावेज शोधायला सुरुवात केली. २०१८ ते २०२३ पर्यंत लाखोने मराठे ओबीसीमध्ये असल्याचे पुरावे सापडले आहेत. आता आमचं म्हणणं आहे की ७० वर्षे आमचे पुरावे लपवून ठेवले कोणी? त्यांची सरकारने नावे सांगावीत. तुम्ही कशाच्या आधारावर मराठ्यांचे पुरावे नाही, असं म्हणाला होतात. मग ते आता कसे सापडले?”, असा प्रश्न जरांगेंनी उपस्थित केला.

हे देखील वाचा : अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीवर रोहित पवार म्हणाले…