Sangram Jagtap : नगर : महाराष्ट्र विधानमंडळ संसदीय ऑनलाईन प्रणालित बदल करून जिल्ह्याचे व शहराचे नाव अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर करावे. या बदलासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, या मागणीचे निवेदन अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap), आमदार विठ्ठल लंघे (Vitthal Langhe) व आमदार अमोल खताळ (Amol Khatal) या महायुतीच्या आमदारांनी मंगळवार (ता. ११) रोजी विधानमंडळाचे (Legislative Assembly) अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना विधानभवनात दिले.
नक्की वाचा : महिला ग्रामसभेत दारू दुकान गावाबाहेर घेऊन जाण्याचा निर्णय
महाराष्ट्र शासनाची राजपत्रित अधिसूचना
या अधिवेशनात आ. जगताप, आ. लंघे व आ. खताळ यांनी सभापती राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. काही महिन्यापूर्वी अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नामांतर ‘अहिल्यानगर’ करण्यात आले आहे. त्यास राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मंजुरी देण्यात आली. त्यानुसार, महाराष्ट्र शासनाने राजपत्रित अधिसूचना प्रसिद्ध करून अधिकृतरीत्या शहर व जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ असे निश्चित केले आहे.
अवश्य वाचा : शिव्या बंदीच्या शासन निर्णयासाठी सरपंच आरगडे यांचे उपोषण
बदल करण्याची मागणी (Sangram Jagtap)
मात्र, अद्याप महाराष्ट्र विधानमंडळाच्या संसदीय ऑनलाईन प्रणालीत शहराचे व जिल्ह्याचे नाव अहमदनगर असेच दर्शवले जात आहे. शासनाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, हे नामांतर झाले असल्याने आपल्या कामकाजात अहिल्यानगर असे अद्ययावत करणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे.