नगर : ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. साखरेची एमएसपी (MSP) म्हणजेच किमान बाजार मूल्य वाढवण्याची (Sugar Price Hike) दाट शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारच्या ऊस गाळप हंगाम धोरण बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केंद्र सरकारडे शिफारस केल्याची माहिती आहे.
नक्की वाचा: राज्यात लवकरच १७०० पदाची तलाठी भरती होणार; महसूल सेवकांसाठी राखीव पदे
सध्या सारखेचा दर २१०० रुपये प्रति क्विंटल आहे. तो ४१०० रुपये करण्याची प्रमुख मागणी झालेल्या बैठकीत करण्यात आल्याचे बोललं जात आहे. हा निर्णय झाल्यास याचा फायदा साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांना होईल. या संदर्भात २०ऑक्टोबरला राज्य सरकारकडून केंद्रीय अन्न व ग्राहक संरक्षण मंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात या निर्णयावर काय निर्णय होणार आणि राज्यात लवकरच साखरेच्या दरात वाढ होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अवश्य वाचा: रोहित-विराटची जोडी पुन्हा मैदानात कधी दिसणार?
भारताचा साखरेचा साठा वाढणार (Sugar Price Hike)
भारतीय साखर आणि जैव-ऊर्जा उत्पादक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, २०२५-२६ या वर्षात (१ ऑक्टोबरपासून) उत्पादन ३४.९ दशलक्ष मेट्रिक टनापर्यंत वाढू शकते. नवीन हंगामात देशातील साखरेचा वापर २८.५ ते २९ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. जो या वर्षी २८ दशलक्ष मेट्रिक टन होता. भारत नवीन विपणन वर्षाची सुरुवात ५ दशलक्ष मेट्रिक टनांच्या साठ्याने करेल, जो या वर्षाच्या सुरुवातीला ८ दशलक्ष मेट्रिक टन होता.
भारतात साखरेचं मोठं उत्पादन (Sugar Price Hike)
देशातील काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र आहे. त्यामुळं दरवर्षी भारतात मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन होतं. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश म्हणून जगभरात भारताची ओळख आहे. आपली देशाची गरज भागवून देश मोठ्या प्रमाणात साखरेची निर्यात परदेशात करतो. यावर्षी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली आहे. त्यामुळं यावर्षी साखेरच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



