Pankaja Munde : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) हे केवळ ऐतिहासिक शहर आहेच पण विकासाच्या दृष्टीने राज्यातील आदर्श शहर बनविण्यासाठी महायुतीने केलेल्या संकल्पास पाठबळ देण्याचे आवाहन मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांंनी केले. पाणीपुवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, रोजगार आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या (Central and State Government) योजना प्रभावी अंमलबजावणी करण्यात कटीबध्द राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
नक्की वाचा : सिसपे घोटाळ्याप्रकरणी निर्णायक वळण; पोलीस अधीक्षक घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव, घोषणाबाजी आणि जल्लोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ना. पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रचार रॅली संत वामनभाऊ नगर चौक, तपोवन रोड–गाडेकर चौक, मुळे एस.टी.डी., लोकनेते गोपीनाथजी मुंडे मार्ग व संत भगवानबाबा चौक या प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली. रॅलीदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधला.
अवश्य वाचा : देवेंद्र मामा रेल्वे द्या, विखे मामा रेल्वे द्या… विद्यार्थ्यांनी दिल्या घोषणा
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, (Pankaja Munde)
महापालिकेत सक्षम, प्रामाणिक आणि काम करणारे प्रतिनिधी असतील तरच शहराचा विकास वेगाने होतो. भाजपा–राष्ट्रवादी युतीचे उमेदवार विजयी करा. अहिल्यानगरला आधुनिक सुविधा, मजबूत पायाभूत व्यवस्था आणि नव्या रोजगाराच्या संधी देण्याची जबाबदारी आम्ही घेतो. विकास हेच आमचे राजकारण आहे आणि तोच आमचा अजेंडा आहे.

हे देखील वाचा: मुंबईत कोण महापौर होणार?, प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे अन् राऊतांना टोले
पालकमंत्री या नात्याने शहर व जिल्ह्याच्या विकासाची स्पष्ट दिशा मांडताना ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, अहिल्यानगरच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय, दर्जेदार रस्ते, सक्षम आरोग्य सुविधा, शिक्षण व रोजगार निर्मिती यावर ठोस काम सुरू आहे. महापालिकेत भाजपा–राष्ट्रवादी युतीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले, तर निर्णयक्षम प्रशासन मिळेल आणि विकासकामांना दुप्पट गती मिळेल. नागरिकांचे प्रश्न कागदावर नव्हे, तर प्रत्यक्षात सोडवले जातील.

यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, भाजपा–राष्ट्रवादी युतीचे अधिकृत उमेदवार, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



