Accident | अहिल्यानगर तालुक्यातील वाळुंज बायपास शिवारात बसचा अपघात; २० जण जखमी  

0

Accident | नगर: वाळुंज बायपास परिसरात आज (ता. २६) दुपारी सुमारे चारच्या सुमारास एसटी बस आणि वऱ्हाडाची स्कूल बस यांच्यात भीषण अपघात (Accident) झाला. भरधाव वेगात येणाऱ्या एसटी बसने स्कूल बसला जोराची धडक दिल्याने २०ते २१ जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

हे वाचा – खांडगाव येथील कोंगजाई देवी नूतन मंदिराचे लोकार्पण

वाळुंज उड्डाणपुलाखाली अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, वऱ्हाड चिंचोडी पाटील येथील नागरिक लग्न समारंभ आटोपून परत येत असताना वाळुंज उड्डाणपुलाखाली हा अपघात घडला. धडकेचा आवाज इतका जोरदार होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

नक्की पहा : गोदा ते नर्मदा जलयात्रा! अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी वर्षाचा खास उपक्रम

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल

घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदेश कार्ले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्वतः पुढाकार घेत चार जखमींना आपल्या वाहनातून जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. उर्वरित पाच जखमींना ॲम्ब्युलन्सद्वारे उपचारासाठी हलविण्यात आले.

हे पहा – वयाची तिशी ओलांडलीये? मग ‘या’ ३ चुका टाळा!

स्थानिक नागरिक आणि मदतकार्यकर्त्यांनी जखमींना बाहेर काढून तातडीने मदत केली. संदेश कार्ले हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना मदतीचा हात देत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here