Sujay Vikhe : नगर : महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. महिलांविरोधात गैरप्रकार करणाऱ्या प्रवृत्तींना कायद्याच्या चौकटीत कठोरपणे सामोरे जाऊ, अशी ठाम भूमिका माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. राहाता नगर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन सोहळ्यात माजी खासदार तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील सहभागी झाले. यावेळी नगरसेविका, नगर परिषदेमधील महिला अधिकारी कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी तसेच शहरातील भगिनींनी डॉ. विखे पाटील यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
नक्की वाचा : लेखकांमधील संवेदनशीलतेमुळे साहित्य समृद्ध : सुनेत्रा पवार
“विश्वास हीच माझ्या कार्याची खरी उपलब्धी”
या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डॉ. विखे पाटील यांनी महिलांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख केला. “नगरसेविकेपासून रस्त्यावर स्वच्छता करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येक भगिनीला माझ्यात तिचा भाऊ किंवा कुटुंबातील व्यक्ती दिसते, ही माझ्यासाठी मोठी समाधानाची बाब आहे. सर्वसामान्य महिलांच्या मनात ‘आपण हक्काने दादांकडे जाऊ शकतो’ हा विश्वास निर्माण होणे, हीच माझ्या कार्याची खरी उपलब्धी आहे”, असे ते म्हणाले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सुजय विखे म्हणाले (Sujay Vikhe)
महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, “महिलांना सुरक्षित वातावरण मिळणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून समाजाचीही सामूहिक जबाबदारी आहे. महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकाराला पाठीशी घातले जाणार नाही. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, अतिक्रमण हटविणे अथवा अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत काहींकडून टीका करण्यात आली. मात्र, महिलांच्या सुरक्षेचा आणि सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल, तर दबावाला बळी न पडता कायद्याच्या चौकटीत निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.



