Navratri Festival : नवरात्रोत्सवात शहरात ठिकठिकाणी होतोय मातृशक्तीचा जागर

Navratri Festival : नवरात्रोत्सवात शहरात ठिकठिकाणी होतोय मातृशक्तीचा जागर

0
Navratri Festival : नवरात्रोत्सवात शहरात ठिकठिकाणी होतोय मातृशक्तीचा जागर
Navratri Festival : नवरात्रोत्सवात शहरात ठिकठिकाणी होतोय मातृशक्तीचा जागर

Navratri Festival : नगर : आदिशक्ती देवीचे नवरात्र (Navratri) सध्या सर्वत्र भक्तिभावाने साजरे होत आहे. या नवरात्र उत्सवात (Navratri Festival) मराठमोळ्या लोककलेच्या माध्यमातून मातृशक्तीचा जागर अहिल्यानगर शहरात विचार भारतीच्या वतीने करण्यात येत आहे. ‘मातृशक्तीचा जागर करू या, आदर्श परिवार घडवू या’, या समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन शहरात ठिकठिकाणी करण्यात येत आहे. लोककलावंत अभियंता सोमनाथ तरटे हे साथीदारांसह शहरातील विविध नवरात्रीच्या मंडळांमध्ये रोज सायंकाळी गोंधळाच्या माध्यमातून कर्तृत्ववान मातृशक्तीचा जागर करून भाविकांमध्ये वैचारिक जनजागृती (Awareness) करत आहेत.

Navratri Festival : नवरात्रोत्सवात शहरात ठिकठिकाणी होतोय मातृशक्तीचा जागर
Navratri Festival : नवरात्रोत्सवात शहरात ठिकठिकाणी होतोय मातृशक्तीचा जागर

कर्तृत्ववान स्त्रियांच्या कर्तृत्वाचा जागर

या उपक्रमाचा प्रारंभ पाईपलाईन रस्त्यावरील तुळजाभवानी देवी मंदिरात करण्यात आला. या कार्यक्रमातून आदिशक्ती देवीच्या जागर होण्याबरोबरच राजमाता जिजाबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई, रणरागिणी राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, संत कान्होपात्रा, गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर, सुवर्णकन्या पी. टी. उषा, अंतराळवीर कल्पना चावला व सध्याच्या राष्ट्रपती द्रैपदी मुर्मू या कर्तृत्ववान स्त्रियांच्या कर्तृत्वाचा जागर करणारे फ्लेक्सचे प्रदर्शन स्थळी लावण्यात आले होते. तसेच मी शिवबा घडवणार, मी जिजाऊ होणार ! हा सेल्फी पॉईंटही येथे लावण्यात आला होता. या सेल्फी पॉईंटचे मंदिराच्या परिसरात लावण्यात आले होते. यावेळी सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती.

शिवाजी महाराजांचा जयजयकार (Navratri Festival)

यावेळी अभियंता सोमनाथ तरटे यांनी गोंधळ लोककलेतून कतृत्त्ववान स्त्रियांच्या महिमा सांगून महिलांमध्ये प्रबोधन केले, तसेच बाल शाहीर गणेश जाधव याने आपल्या पहाडी आवाजात शिवाजी महाराजांचा जयजयकारात अफजल खानाचा वधाचा पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विचार भारतीचे उपाध्यक्ष अशोकराव गायकवाड, उपक्रमाचे प्रमुख पुष्कर कुलकर्णी, अशोक कानडे, अमित खामकर, ओमप्रकाश तिवारी, स्मिता शितोळे, विचार भारतीचे मार्गदर्शक रवींद्र मुळे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विचार भारतीचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी, सचिव सुधीर लांडगे, सहसचिव महेंद्र जाखेटे व उपक्रमाचे संयोजक पुष्कर कुलकर्णी आदींनी या उपक्रमाचे नियोजन केले.