Sangram Jagtap : नगर : शहरात माळीवाडा भागात झालेल्या रांगोळी प्रकरणामुळे शहरात वातावरण तापले आहे. अशात मुस्लिम समाजाकडून (Muslim Society) कोतवाली पोलीस ठाणे समोरच लावण्यात आलेल्या वादग्रस्त फलक व हिंदू तरुणाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) आक्रमक होत त्यांनी संबधितांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीससाठी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) दोन तास ठिय्या दिला.
अवश्य वाचा: नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले मंत्री केवळ फोटोसेशन करतात : थोरात
हिंदुत्ववादी संघटनांचे कायकर्ते उपस्थित
यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा करून कारवाईचे आश्वासन दिले. यावेळी मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनांचे कायकर्ते उपस्थित होते.
नक्की वाचा : मोठी बातमी!आता लाडक्या बहिणींना मिळणार कर्ज!
आमदार संग्राम जगताप म्हणाले, (Sangram Jagtap)
हिंदूंचा पवित्र नवरात्र उत्सव सुरु आहे. मात्र, शहरात काहींनी जातीय तेढ निर्माण करणारे फलक लावून मुद्दाम जातीय तेढ निर्माण करत आहेत. हे फलक त्वरित काढण्यात यावेत. नवरात्री निमित्त काढण्यात आलेल्या हिंदूंच्या दुर्गामाता दौड सुरु असताना काहिनी हिंदूंच्या भावना दुखेल, असे कृत्य केले आहे. कोतवाली पोलीस ठाणे जवळच हिंदू युवकाला नि:ष्कारण मारहाण केली आहे. या सर्व घटना निंदनीय असून हिंदूंच्या भावना दुखावाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी संबधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी. शहरातील सर्व नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठवता शांतात ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.