Rain Alert : ३० व ३१ मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

Rain Alert : ३० व ३१ मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

0
Rain Alert : ३० व ३१ मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
Rain Alert : ३० व ३१ मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

Rain Alert : नगर : सध्या राज्यातील काही भागात अंशतः आभाळी हवामान आहे. ही स्थिती या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या दक्षिण भागांमध्ये ३० मार्च दरम्यान दुपारनंतर स्थानिक स्वरूपाचा वादळी पाऊस (Rain Alert) पडू शकतो. हा पाऊस प्रामुख्याने कर्नाटक (Karnataka)तेलंगणा (Telangana) सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये राहण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा : कर्जत तालुक्यात कोरोनानंतर प्रथमच झळकले इंधन संपल्याचे फलक

हवामानात दिसू शकतो बदल

३० मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. उर्वरित विदर्भात देखील हवामानात बदल दिसू शकतो. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही. ३१ मार्चला देखील राज्याच्या काही भागांमध्ये या हवामानाचा परिणाम दिसू शकतो.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कृषी विभागाकडून आवाहन (Rain Alert)

शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.