Sharad Pawar : राज्यघटनेचा व समतेचा विचार टिकवण्यासाठी लढा : शरद पवार

Sharad Pawar : संगमनेर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पाण्यापासून वीज निर्मितीची नवीदृष्टी दिली.

0
Sharad Pawar : राज्यघटनेचा व समतेचा विचार टिकवण्यासाठी लढा : शरद पवार
Sharad Pawar : राज्यघटनेचा व समतेचा विचार टिकवण्यासाठी लढा : शरद पवार

Sharad Pawar : संगमनेर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पाण्यापासून वीज निर्मितीची नवीदृष्टी दिली. त्यांनी उपेक्षित वर्गात आत्मविश्वास निर्माण केला केला. त्यांनी दिलेला राज्यघटनेचा व समतेचा विचार टिकवण्यासाठी लढा सुरू असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.

हे देखील वाचा : नगर जिल्ह्यात अलर्ट; जिल्हादंडाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश लागू 


आश्वी बुद्रुक येथील एका खासगी कार्यक्रमात व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार प्रकाश गजभिये, ज्येष्ठ नेते रावसाहेब म्हस्के, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड, अरुण कडू, दुर्गाताई तांबे, रणजीत सिंह देशमुख, बाजीराव खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, उत्कर्षा रुपवते, गणपत सांगळे, सुधीर म्हस्के, अशोकराव गायकवाड, वैशाली गायकवाड, सरपंच नामदेव शिंदे, विजय हिंगे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

नक्की वाचा : राजूर प्रदर्शनात इगतपुरीच्या भोसलेंचा वळू ठरला चॅम्पियन


यावेळी पवार म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाणी व वीज हे खाते होते. त्यातून त्यांनी धरणांची निर्मिती करण्यासह पाण्यापासून वीजनिर्मिती करून भारताला एक नवी दृष्टी दिली. याचबरोबर कार्यकर्त्यांचा मोठा संच निर्माण करताना उपेक्षित वर्गामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. संविधानाने समता दिली असून सध्या भारतीय राज्यघटना व संविधान धोक्यात असल्याने सर्वांनी एकजुटीने समतेचा हा विचार टिकवण्यासाठी सुरू झालेल्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार थोरात म्हणाले, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी कायम कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. राज्यभरातील हाडाचे कार्यकर्ते शोधून त्यांना संधी दिली आहे .सर्वसामान्यांचा सन्मान करणे हे त्यांचे वैशिष्ट्य असून कृषीमंत्री पदाच्या काळात सहा वर्ष पवार साहेबांबरोबर काम करताना राज्याचे विक्रमी कृषी उत्पन्न केले.


आमदार सत्यजित तांबे म्हणाले, पवार साहेबांनी देशभरात जमवलेली कार्यकर्त्यांची फळी हीच मोठी संपत्ती आहे. आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या न्यायालयात मविआ सरकारलाच बहुमत मिळणार असून आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. तर माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले, जातीयवादी आणि धर्मांध शक्तीचा विचार रोखण्यासाठी आता संविधान वाचवणाऱ्या विचाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा. यावेळी अशोक गायकवाड ,रावसाहेब म्हस्के, श्रीकांत भालेराव यांचीही भाषणे झाली. यावेळी नवनाथ आंधळे, बबनराव शिंदे, संतोष ताजणे, आनंद गायकवाड, अरुणा हिंगे, प्रतिभा सोमनाथ जोंधळे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय हिंगे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. राहुल जऱ्हाड यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here