Shivrayancha Chhava: बॉलिवूड अभिनेता राहुल देव झळकणार ‘शिवरायांचा छावा’ मध्ये

अनेक हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये खलनायक म्हणून झळकलेले अभिनेते राहुल देव आता आगामी ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात ‘काकर खान’ ही खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

0
Shivrayancha Chhava
Shivrayancha Chhava

नगर : अनेक हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये खलनायक म्हणून झळकलेले अभिनेते राहुल देव (Rahul Dev) आता आगामी ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात ‘काकर खान’ (kakar Khan) ही खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. ‘शिवरायांचा छावा’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. 

दिग्पाल लांजेकर यांनी केले ‘शिवरायांचा छावा’ चे दिग्दर्शन (Shivrayancha Chhava)

ए.ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. औरंगजेबाने बुऱ्हाणपूरची पूर्ण जबाबदारी काकर खान या अनुभवी सरदारावर सोपविली होती. लोकांवर जिझिया कर लावत काकर खानने जनतेला वेठीस धरले होते. काकरखानच्या अन्यायी राजवटीपासून छत्रपती संभाजी महाराजांनी रयतेची सुटका केली होती.  

नक्की वाचा : अभिनेत्री प्राजक्ता माळीची आता ‘भिशी मित्र मंडळ’मध्ये एंट्री

राहुल द्देव यांनी सांगितला काकर खान साकारतानाचा अनुभव (Shivrayancha Chhava)

आपल्या या भूमिकेविषयी बोलताना राहुल देव यांनी सांगितले की, ‘आजवरच्या अभिनय कारकिर्दीत अनेक खलनायकी भूमिका साकारल्या असल्या तरी क्रूरकर्मा ‘काकर खान’ ही ऐतिहासिक भूमिका करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. एखादी विशेष भूमिका वठवताना अगदी भाषेपासून चालण्या बोलण्याच्या सवयीपर्यंतचे बदल करावे लागतात. काकरखान खानची भूमिका असल्याने उर्दू भाषा आत्मसात करणं मला गरजेचं होत. प्रत्येक भाषेचा स्वत:चा असा लहेजा असतो. तो लहेजा लक्षात घेत ही भाषा मी शिकून घेतली. भाषेनंतर प्रश्न होता तो लुक्सचा. त्यामुळे देहबोलीही तितकीच बोलकी असण्याची महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर होती. ती मी माझ्या अभिनयातून केली असल्याचे राहुल सांगतात.  

अवश्य वाचा : शेतकऱ्यांचं आंदोलन 2.0 उद्या दिल्लीत धडकणार

मल्हार पिक्चर्स कंपनीचे  वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. कार्यकारी निर्माता प्रखर मोदी आहेत. कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए.ए.फिल्म्स सांभाळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here