RPI : घरांच्या नोंदीसाठी आरपीआयचा आंदोलनाचा इशारा

RPI : घरांच्या नोंदीसाठी आरपीआयचा आंदोलनाचा इशारा 

0
RPI : घरांच्या नोंदीसाठी आरपीआयचा आंदोलनाचा इशारा 
RPI : घरांच्या नोंदीसाठी आरपीआयचा आंदोलनाचा इशारा 

RPI : कर्जत : अनेक वर्षांपासून कर्जत शहरात (Karjat City) राहत असताना पक्की घरे असून त्याची भूमी अभिलेख कार्यालयास कसलीही नोंद नाही. नोंदीसाठी वारंवार कार्यालयाकडे पाठपुरावा करून आजमितीस त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने आरपीआय (RPI) कर्जतच्यावतीने भजन, कीर्तन, जलसा तसेच डफडे बजाव आंदोलन करून उपोषणाचा इशारा (Hunger Strike) नगरपंचायत विभागास देण्यात आला आहे.

नक्की वाचा : शिक्षिका धर्मांतराबाबतचे धडे देत असल्याचा आरोप; पोलीस अधीक्षकांना निवेदन

नागरिक आणि कुटुंब चिंतातूर

कर्जत शहरातील अक्काबाईनगर, सिध्दार्थनगर, राजीव गांधीनगर, लहुजीनगर, आण्णाभाऊ साठेनगर या भागात सर्वसामान्य नागरिक कुटुंबासह पक्क्या घरात वास्तव्य करीत आहे. अनेक दिवसांपासून नागरिक घरांच्या नोंदीसाठी कर्जत नगरपंचायत यासह सिटीसर्व्हे भूमी अभिलेख विभागाकडे रीतसर मागणी करीत आहे. घराच्या नोंदीसाठी संबंधित विभागाकडे आवश्यक मोजणी करावी यासाठी पाठपुरावा देखील केला. मात्र आजमितीस कोणतीच पाहणी अथवा मोजणी झाली नाही. यामुळे नागरिक आणि कुटुंब चिंतातूर आहेत.

अवश्य वाचा : महापालिकेच्या मतदार यादीत श्रीगोंद्याची चार हजार नावे; अभिषेक कळमकरांचे आयुक्तांना निवेदन

१० डिसेंबरपर्यंत कार्यवाही न केल्यास आमरण उपोषण (RPI)

त्यामुळे कर्जत आरपीआय ८ डिसेंबरपासून कर्जत नगरपंचायत कार्यालयासमोर आपल्या न्यायिक मागण्या पूर्ण होईपर्यंत भजन, कीर्तन, जलसा तसेच डफडे बजाव आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. प्रशासनाने १० डिसेंबरपर्यंत यावर उचित कार्यवाही न केल्यास त्यापुढे आमरण उपोषण करण्यात येईल अशी माहिती आरपीआयचे उत्तर महाराष्ट्रचे उपाध्यक्ष अंकुश भैलुमे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी युवक उपाध्यक्ष विशाल काकडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम, वृद्ध भूमिहीन संघटनेचे अध्यक्ष शब्बीरभाई पठाण, शिवसेना उबाठाचे प्रा अमोल क्षीरसागर, भीमशक्ती संघटनेचे अनिल समुद्र आणि गोदड समुद्र उपस्थित होते.