
Warkari Tradition : राहाता : आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) अध्यात्मिक सोहळ्याच्या निमित्ताने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने तयार केलेला नियोजनाचा पॅटर्न वारकरी सांप्रदायाला (Warkari Tradition) दिलासा देणारा ठरला आहे.अहिल्यानगरसह अन्य जिल्ह्यातील पालख्याही रवाना होत असल्याने पालखी मार्ग विठ्ठलमय झाला आहे.
नक्की वाचा : वृद्धेश्वर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा आप्पासाहेब राजळे तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब किलबिले

प्रथमच दोन्ही जिल्ह्यात योग्य तो समन्वय
अध्यात्माचा वारसा असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातून मानाच्या पालख्यांसह असंख्य गावातील वारकरी पंढरपूरला जात असतात. यापुर्वी वारकरी संप्रदायाचा एवढा गांभीर्यपूर्वक विचार झाला नव्हता. त्यामुळे पालखी मार्गावर वारकार्यांना मोठ्या समस्यांना सामना करावा लागत होता. मंत्री विखे पाटील सोलापूर आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री झाल्यानंतर आषाढी वारी करीता येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण करून देण्याच्या हेतूने प्रथमच दोन्ही जिल्ह्यात योग्य तो समन्वय घडवून त्यांनी वारकर्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची संकल्पना कृतीत उतरवली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
रस्ते दुरूस्त झाल्याचे मोठे समाधान (Warkari Tradition)
सलग तिसऱ्या वर्षी मंत्री विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून दिंडी जात असलेल्या मार्गावर वाॅटरफ्रूप मंडप, पिण्याच्या पाण्याची सुविधा स्वच्छता गृह, महीला व पूरुषांसाठी स्वतंत्र आंघोळीची व्यवस्था आणि विशेष म्हणजे आरोग्य आणि सुरक्षा पथक देखील चांगल्या पद्धतीने नियुक्त केले आहेत. विशेष म्हणजे रस्ते दुरूस्त झाल्याचे मोठे समाधान वारकरी व्यक्त करीत आहेत.मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर प्रशासनाने आषाढी वारीसाठी निर्माणए केलेला पॅटर्न जिल्ह्याच्या अध्यात्मिक क्षेत्राची नवी ओळख ठरली आहे.
मुक्कामासाठी मंडप उभारल्या मोठा दिलासा
जिल्ह्यातून चार मानाच्या पालख्यासह नाशिक, जळगाव, धुळे या जिल्ह्यातील अनेक देवस्थांच्या पालख्या मार्गस्थ होत असतात. यंदा ही संख्या तिनशेहून अधिक असल्याचे सांगण्यात येते.जिल्ह्यातून मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरला जात असून विठ्ठल नामाच्या जयघोषाने जिल्हा दुमदुमून गेला आहे.जिल्हा प्रशासन मार्गावर सतर्कतेने वारकर्यांच्या स्वागतासाठी सज्ज असून प्रत्येक तालुक्यात एक समन्वय अधिकारी नेमून देण्यात आल्याने दिंडी प्रमुखांना संपर्क साधण्यात कोणतीही अडचण येत नाही.सध्या पाऊस थांबला असला तरी मुक्कामासाठी भव्य मंडप उभारल्याचा मोठा दिलासा मिळाला आहे.
या उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ
मागील तीन वर्षापासून सुरू झालेला पॅटर्न जिल्ह्याच्या अध्यात्मिक क्षेत्राची नवी ओळख ठरलाच पण यापेक्षाही महत्वाचे म्हणजे मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठबळ दिले आहे.राज्य सरकारने यंदाच्या वर्षी तीन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.वारकर्यांसाठी रुग्ण सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून महात्मा फुले जन आरोग्य योजना असलेल्या रूग्णालयांना मोफत सुविधा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा प्रथम मुख्यमंत्री सहाय्यता कक्षानेही वारीच्या सेवेत योगदान देण्याचा निर्णय केला असून जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या मदतीने वारकरी चरणसेवेचा उपक्रम नव्याने सुरू झाला आहे.
पावसाळी अधिवेशन सुरू असतनाही मंत्री विखे पाटील यांनी वारीसाठी केलेल्या नियोजनाचा सातत्याने आढावा अधिकार्याकडून घेत होते.यंदाच्या वर्षी झालेल्या नियोजनाबद्द्ल वारकरी समाधान व्यक्त करीत आहेत


