Karjat Agricultural Produce Market Committee : कर्जत : मागील वीस वर्षांपासून कर्जतची कृषी उत्पन्न बाजार समिती विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांच्या ताब्यात असून या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Karjat Agricultural Produce Market Committee) आजमितीस सर्वसामान्य शेतकऱ्यांचा शेतमाल बिगर लिलावाचा घेतला जातो. यामुळे तेथील आडत व्यापार सर्वसामान्य शेतकऱ्यांचा माल आपल्या मनमानी दरानेच घेत असून याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे दीपक यादव (Deepak Yadav) यांनी प्रसिध्द पत्रकाद्वारे लक्ष वेधले आहे.
नक्की वाचा : डॉ. सुजय विखे यांनी दिलेला शब्द केला पूर्ण; विनयभंग प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोझर
कर्जत बाजार समितीमध्ये लिलाव पद्धत अनेक वर्षांपासून बंद
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विधान परिषदेचे सभापती आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय राम शिंदे यांची सत्ता आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी एक जीवनदायी म्हणून कार्यरत असली पाहिजे. मात्र कर्जतची कृषी उत्पन्न बाजार समिती यास अपवाद ठरत आहे. राज्यात जवळपास सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांचा शेतमाल उघड लिलाव पद्धतीने सर्वां समक्ष खरेदी केला जातो. परंतु कर्जतच्या बाजार समितीमध्ये ही लिलाव पद्धत अनेक वर्षांपासून बंद असून आडत व्यापारी आपल्या मनमानी पद्धतीने हवा तसा भाव काढत शेतमाल खरेदी करताना दिसतात.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
बळीराजाचे आर्थिक नुकसान (Karjat Agricultural Produce Market Committee)
या मनमानी दराने लाखोंचा पोशिंदा असणारा बळीराजाचे अतोनात आर्थिक नुकसान होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मीडिया प्रमुख दीपक यादव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे लक्ष वेधले आहे. यात दीपक यादव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, उपसभापती अभय पाटील, विद्यमान संचालकांनी खुल्या पद्धतीने लिलाव काढत शेतमालाची खरेदी करावी. तसेच कर्जत तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक पिळवणूक थांबवावी. आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.



