Guvahati : नगर : आसाममध्ये नवीन सरकारच्या शपथविधी समारोहापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुवाहाटीतील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात भेट दिली. त्यांनी माता कामाख्येच्या दर्शनासाठी नीलाचल पर्वतावर जाऊन मनोभावे पूजा केली.
हेही वाचा : सोलापूर महामार्गावर वाहन पलटी, तरुण वकिलासह दोन ठार
भाविकांनी केले स्वागत
मंदिरात दर्शन घेतल्यानंतर फडणवीस म्हणाले, “माता कामाख्येच्या आशीर्वादाने सर्व अडथळे दूर होतात आणि सकारात्मक शक्तींचे सशक्तीकरण होते.” त्यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाच्या प्रगतीसाठी देवीच्या कृपेचे श्रेय दिले. ही भेट आसाम भाजप सरकारच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. फडणवीस यांच्या या दर्शनामुळे मंदिर परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले होते. अनेक कार्यकर्ते आणि भाविकांनी त्यांचे स्वागत केले.
नक्की पहा : वायूदलाच्या चित्तथरारक कसरतींनी न्हाऊन निघाले ‘सोमनाथ’चे आकाश!
फडणवीस म्हणाले… (Guvahati)
यावेळी फडणवीस म्हणाले, “माता कामाख्या सर्वांना शक्ती देतात. हिमंता सरमा यांच्या नेतृत्वात आसाम पुन्हा एकदा विकासाच्या पथावर निघेल, याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे.” ही भेट महाराष्ट्र आणि आसाममधील सांस्कृतिक व राजकीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे. फडणवीस यांच्यासोबत इतर भाजप नेतेही उपस्थित होते.



