Narendra Modi : ‘देशात माेदी आणि याेगी यांच्या कणखर भूमिकेमुळे हिंदू धर्माचे रक्षण’

Narendra Modi : 'देशात माेदी आणि याेगी यांच्या कणखर भूमिकेमुळे हिंदू धर्माचे रक्षण'

0
Narendra Modi
Narendra Modi

Narendra Modi : नगर : केवळ देशामध्ये नरेंद्र माेदी (Narendra Modi) आणि योगी यांच्या कणखर भूमिकेमुळे हिंदू धर्माचे (Hinduism) रक्षण होत आहे. पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आपल्यालाही मागे राहून चालणार नाही. धर्म आणि राष्ट्र हिताकरीता प्रत्येकाने योगदान देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रबोधनकार संग्राम महाराज भंडारे (Sangram Maharaj Bhandare) यांनी केले. सकल हिंदू समाजातर्फे (Hindu society) माळीवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रहित सर्वपरी या विषयावरील कार्यक्रमात भंडारे यांनी लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, बळजबरीने होत असलेल्या धर्मातराच्या घटनांची उदाहरण देऊन हिंदू धर्माच्या विरोधात जाणीवपूर्वक करण्यात येत असलेल्या षडयंत्राच्या विरोधात एकत्रित येण्याचे आवाहन त्यांनी केले.

हे देखील वाचा: नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी वाहतुकीत बदल; अनेक रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग काेणते?

कोट्यवधी हिंदूच्या अपेक्षांची पूर्ती (Narendra Modi)

देशावर अतिरेक्यांकडून होणारे हल्ले २०१४ नंतर बंद झाले याचे एकमेव कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली कणखर भूमिका. जम्मू कश्मिरमध्ये असलेले ३७० कलम हटवले. अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे झालेले निर्माण ही कोट्यवधी हिंदूच्या अपेक्षांची पूर्ती ठरली असल्याचे संग्राम भंडारे म्हणाले. आज हिंदू धर्माला जाणीपूर्वक लक्ष बनवले जात आहे, याचे कारण फक्त सहनशीलता. पण आता अन्याय सहन करीत बसण्यापेक्षा आवाज उठवण्याची गरज आहे.

नक्की वाचा: नरेंद्र माेदींकडून आराेग्य विकास प्रक्रियेशी जाेडण्याचे महत्त्वपूर्ण काम : राधाकृष्ण विखे पाटील

हिंदूनी संघटितपणे उभे राहाण्याची आवश्यकता (Narendra Modi)

सोशल मीडियावर व्यक्त होण्यापेक्षा आता हिंदूनी संघटितपणे उभे राहाण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान मोदी आता विश्वनेते म्हणून ओळखले जातात, अनेक देशाचे राष्ट्राध्यक्ष मोदींचा शब्द आता प्रमाण मानतात. एवढे कणखर नेतृत्व आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना आपणच घरात बसून चालणार नाही. हिंदू धर्माच्या हितासाठी काम करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याचे कर्तव्य आपल्या सर्वांना बजवावे लागणार असल्याचे भंडारे यांनी सांगितले.


आज लोकसभा निवडणुकीचे वातावरण सुरू आहे. लोकशाही मानणारे आपण आहोत. एका मताचे महत्त्व खूप मोठे आहे. सर्वाधिक मतदान कसे मोदींना कसे होईल, याचा विचार आपण करावा, असे आवाहन करून प्रत्येक मत राष्ट्रहितासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे भंडारे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here