Radhakrishna Vikhe Patil : जिल्ह्यात आलेले उद्याेग ही पवारांची मेहेरबानी नाही : राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : जिल्ह्यात आलेले उद्याेग ही पवारांची मेहेरबानी नाही : राधाकृष्ण विखे पाटील

0
Radhakrishna-Vikhe-Patil
Radhakrishna-Vikhe-Patil

Radhakrishna Vikhe Patil : नगर : शरद पवार (Sharad Pawar) महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री (Chief Minister) होते, केंद्रातही त्‍यांना मंत्रीपद मिळाले, बारामतीच्‍या बाहेर जाऊन त्‍यांनी काय केले? असा सवाल उपस्थित करीत नगर जिल्‍ह्यात आलेले उद्योग ही पवारांची मेहेरबानी नाही. आम्‍ही काय केले यापेक्षा दाऊदच्‍या हस्‍तकांना तुम्‍ही विमानातून घेऊन आलात, हे देशाची जनता अजून विसरलेली नाही, अशी खरमरीत टीका महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली.

हे देखील वाचा: नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी वाहतुकीत बदल; अनेक रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग काेणते?

सभेच्‍या तयारीचा घेतला आढावा (Radhakrishna Vikhe Patil)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या सभेच्‍या तयारीचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. त्‍यानंतर माध्‍यमांशी संवाद साधताना त्‍यांनी शरद पवार यांच्‍यावर निशाणा साधला. शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्‍यावर बोलावे, हेच मुळात दुर्दैव आहे. मोदीजींच्‍या सहकार्यामुळेच शरद पवारांचे राजकीय अस्तित्‍व टिकून आहे. विखे पाटलांनी काय केले, हे शरद पवारांना सांगण्‍याची गरज नाही. या जिल्‍ह्यातून आठ वेळा बाळासाहेब विखे पाटील यांना संसदेत प्रतिनिधित्‍व करण्‍याची संधी मिळाली. मलाही सात वेळा जनतेने निवडून दिले. ही आमच्‍या कामाची पावती आहे, असे स्‍पष्‍ट करुन, शरद पवार यांचे जिल्‍ह्यासाठी काय योगदान आहे, हे त्‍यांनी एकदा सांगावे, असे थेट आव्‍हान मंत्री विखे पाटील यांनी दिले.
शरद पवार यांचे कर्तृत्‍व काय हे राज्‍यातील आणि देशातील जनतेने पाहिले आहे. बारामतीच्‍या बाहेर ते काहीही करु शकलेले नाहीत. केवळ संस्‍था बळकावण्‍याचे काम त्‍यांनी केले. रयत शिक्षण संस्‍था ताब्‍यात घेऊन त्‍याचा राजकीय अड्डा केल्‍याची टीका मंत्री विखे पाटील यांनी केली.

नक्की वाचा: नरेंद्र माेदींकडून आराेग्य विकास प्रक्रियेशी जाेडण्याचे महत्त्वपूर्ण काम : राधाकृष्ण विखे पाटील

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्‍यावरही साधला निशाणा (Radhakrishna Vikhe Patil)

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्‍यावरही मंत्री विखे पाटील यांनी निशाणा साधला. थोरात वैफल्‍यग्रस्‍त झाले असून, त्‍यांच्‍या बोलण्‍याला आता कुठलाही आधार राहिलेला नाही. डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षांत केलेल्‍या कामांची चित्रफीत मी थोरात यांना पाठवणार आहे. थोरातही अनेक वर्षे राज्‍याच्‍या मंत्रिमंडळात होते. नगरसाठी त्‍यांचे योगदान काय? मंत्री पदाच्‍या माध्‍यमातून तुम्‍ही जिल्‍ह्याला कसा फायदा करुन दिला, हे एकदा तरी सांगा. नाहीतर मी तरी महसूल मंत्रीपदाच्‍या माध्‍यमातून जिल्‍ह्यासाठी कोणते निर्णय केले हे सांगायला तयार आहे. पूर्वीप्रमाणे बदल्‍यांचे रेटकार्ड आमच्‍याकडे नाही. भारतीय जनता पक्षामध्‍ये येण्‍याची तुमची तयारी झाली होती. तुमच्‍यासाठी कोणता आमदार मध्‍यस्‍थी करीत होता, हे मला माहीत आहे. तुमच्‍या भ्रष्‍ट्र कारभारामुळे दिल्‍लीतून कसा नकार मिळाला. याचे शल्‍य आता थोरात यांना असल्‍याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्‍या वक्‍तव्‍यावर आपली प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना अशी उथळ विधाने त्‍यांनी टाळली पाहिजेत, एवढेच भाष्य मंत्री विखे पाटील यांनी केले. अमोल कोल्‍हे यांनी प्रचार सभेतून केलेल्‍या टीकेचाही त्‍यांनी समाचार घेतला. कोल्‍हेंना अजून खूप माहिती करुन घ्‍यायची आहे. यासाठी त्‍यांना नाटकातून बाहेर यावे लागेल, असेही ते म्‍हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here