Vivek Kolhe: एक व्यक्ती आदर्श घडला तर परिसराचा कायापालट होतो : विवेक कोल्हे 

Vivek Kolhe : एक व्यक्ती घडला तर परिसर घडतो,असं वक्तव्य सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.

0
vivek kolhe

कोपरगाव : एक व्यक्ती घडला तर परिसर घडतो,असं वक्तव्य सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे (Shankarao Kolhe Cooperative Sugar Factory) अध्यक्ष विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी केले. ते वाकडी (Wakdi) येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. 

नक्की वाचा : विकासामध्ये दहा वर्ष मागे नेलेला नगर जिल्हा पाच वर्ष पुढे नेला : सुजय विखे

श्री गणेश विद्या प्रसारक मंडळाच्या विद्यमाने आयोजित वाकडी येथील श्री लक्ष्मीनारायण विद्यालय आणि राजमाता माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांना अलौकिक साई आस ट्रस्ट दिल्ली व अलोक मिश्रा यांच्या वतीने बुट व सॉक्स वाटप (Distribution of boots and socks) विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मंचावर श्री गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. नारायण कार्ले, डॉ.एकनाथ गोंदकर, वाकडीचे सरपंच रोहिणी आहेर, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्व संचालक, वाकडी, जळगाव, ग्रामस्थ व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

अवश्य वाचा : घारगावमध्ये बिबट्या जेरबंद   

या वेळी बोलताना विवेक कोल्हे म्हणाले की, अलोक मिश्रा यांच्या माध्यमातून जवळपास ३७ लाख ५३ हजार एवढी मदत विद्यालयाला झाली आहे. दातृत्व करणारे अनेक मान्यवर हे पुढील पिढी घडण्यासाठी अपेक्षा ठेवतात. आपली जडणघडण होण्यासाठी शिक्षक आणि आईवडील यांचे मोठे योगदान असते. आपला भारत हा प्रगतीची शिखरे गाठत आहे. मात्र शेजारील देश नागरिकांना अन्न धान्य देण्यासाठी हतबल झाले आहेत. कुठलाही देश आणि परिसर तेव्हा मोठा होतो जेव्हा विद्यार्थ्यांची जडणघडण व्यवस्थीत होते. आपल्या परिसराला ओळख मिळाली ती साईबाबांच्या पावन भूमीमुळे, हे आपले भाग्य आहे. भविष्यात मदतीसाठी पुढे येणारे विद्यार्थी विद्यालयातूनही अधिक घडतील, अशी आदर्श शिकवण देणारा संस्कार रुजतो आहे.

माजी मंत्री दिवंगत शंकरराव कोल्हे यांनी गणेश बंधारे, विविध संस्था यांचे जाळे विणुन आपल्या परिसराला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले. एक व्यक्ती घडला तर परिसर घडतो. दिवंगत संदीप लहारे यांचे स्मरण या निमित्ताने होते. देशाभिमान निर्माण करून आदर्श युवक घडविण्यासाठी सर्वांचा हातभार आवश्यक आहे. भविष्यातील अब्दुल कलाम, किरण बेदी,सचिन तेंडुलकर यांसारखे व्यक्तिमत्व इथे  घडतील, यासाठी कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी यावेळी साई आस परिवार आणि अलोक मिश्रा यांचे कौतुक केले. 

यावेळी बोलताना अलोक मिश्रा म्हणाले की, विवेक कोल्हे यांनी कमी वयात जनसेवेचा वसा चालविला आहे. महाविद्यालयाच्या प्रगतीत आमचे कायम सहकार्य राहील. या भागात आल्यावर साईबाबा भेटल्यासारखे वाटते. विद्यार्थ्यांना होणारी मदत आणि आम्ही करत असलेले कार्य हे निमित्त मात्र आहे. यासाठी असणारी प्रेरणा वाकडी आणि परिसरातील नागरिकांमध्ये आमच्यासाठी साईबाबांचे रूप आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.  विविध क्षेत्रातील यश संपादन केलेल्या विद्यार्थी व सेवकांचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here