Sanjay Raut: एकनाथ शिंदे सरकारी पैशाने गुंडांना पोसतात : संजय राऊत 

 एकनाथ शिंदे हे सरकारी पैशाने गुंड आणि माफियांना बळ देण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

0
Sanjay Raut
Sanjay Raut

नगर :  एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे सरकारी पैशाने गुंड आणि माफियांना बळ देण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गुरुवारी (ता.८) रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या मुद्द्यावरुन आता महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

नक्की वाचा : मुंबई काँग्रेसला धक्का;बाबा सिद्दीकींचा पक्षाला रामराम  

मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला, मंत्रालय आणि नागपूरच्या विधानभवनात अनेक गुंड एकनाथ शिंदे आणि त्यांचे बाळराजे श्रीकांत शिंदे यांना भेटून गेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला ठाणे ते मुंबईपर्यंत अभिनंदनाचे बॅनर्स लावणारे बरेच लोक गुंड आहेत. या गुंडांना सरकारी कंत्राटे दिली जात आहेत. या सरकारच्या काळात पोलीस हे गुंडांचे संरक्षक झाले आहेत. मुंबई आणि ठाण्यात नेमणूक करण्यात आलेले पोलीस हे खाकी वर्दीतील शिंदे सेनेचे सदस्य आहेत. या सगळ्यांची यादी तयार आहे. त्यांचा हिशेब २०२४ नंतर केला जाईल, असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला.

अवश्य वाचा : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पतधोरण जाहीर  

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अपयशी मुख्यमंत्री: संजय राऊत (Sanjay Raut)

राज्यातील गुंडांचा हा नंगानाच अस्वस्थता निर्माण करणार आहे. महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. रोज गुंडगिरीच्या घटना समोर येत आहेत. अशावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठे असायला पाहिजे ? मात्र गृहमंत्री अदृश्य आहेत. अशा परिस्थितीत गृहमंत्री  विदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत ‘चाय पे चर्चा’ करत फिरत आहेत. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची चर्चा कोण करणार? अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस हे अकार्यक्षम आणि अपयशी गृहमंत्री असल्याचे सिद्ध झाले आहे. देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रीपद हे फक्त शिवसैनिकांना तुरुंगात टाकायला आणि भाजपची भूमिका मांडण्यासाठी दिले आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

नरेंद्र मोदी व अमित शाह महाराष्ट्रावर सूड उगवत आहेत: संजय राऊत (Sanjay Raut)

महाराष्ट्रात वाढत असलेली गुन्हेगारी हे अपयश नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे अपयश आहे. मोदी आणि शाह यांनी हा महाराष्ट्रावर उगवलेला सूड आहे. महाराष्ट्रात रोज पडणारे रक्ताचे सडे आणि गुन्हेगारी वाढण्यासाठी तेच जबाबदार आहेत. त्यांनीच हे माफिया राज महाराष्ट्रावर लादले आहे. मग आता ते काय करत आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here